Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताने फेटाळला शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा आरोप

Webdunia
भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याचा पाकिस्तानचा आरोप भारताने फेटाळून लावला आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याचा आरोप हा चुकीचा आणि तथ्यहीन असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
‘भारतीय सैन्य शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नाही. भारतीय सैन्य फक्त शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन होत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देते. यंदाच्या वर्षात झालेल्या एकूण शस्त्रसंधीच्या उल्लंघनापैकी दोन-तृतीयांश उल्लंघनाच्या घटना या मागील पाच आठवड्यांमधील आहेत,’ असे विकास स्वरुप यांनी म्हटले आहे.
 
‘पाकिस्तानकडून भारतीय उच्चायुक्तालयातील काही अधिकाऱ्यांवर हेरगिरीचा आरोप करण्यात आला आहे. आम्हाला हा आरोप मान्य नाही. आम्ही हा आरोप फेटाळून लावतो. भारतीय दूतावासातील अधिकारी व्यापार आणि अर्थसंबंध यावर दोन देशांमधील संवाद वाढावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना नाहक त्रास दिला जात आहे,’ अशी माहिती स्वरुप यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

पुढील लेख
Show comments