Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नूडल्स खाऊन मुलाचा मृत्यू, सहा जणांची प्रकृती गंभीर

Webdunia
रविवार, 12 मे 2024 (13:35 IST)
उत्तर प्रदेशच्या पिलिभीत मधील राहुल नगर गावात दोन कुटुंबातील सहा जणांनी नूडल्स आणि भात खाल्ल्याने  त्यांची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेले. उपचारानंतर ते घरी आल्यावर एका मुलाचा मृत्यू झाला. तर इतरांची प्रकृती खालावली. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 
उत्तर प्रदेशातील पुरणपूर तालुक्यातील राहुल नगर मध्ये राहणाऱ्या सीमाचे लग्न डेहरादूनच्या सोनू सोबत अनेक वर्षांपूर्वी  झाले  होते सीमा आपल्या  मुलांना रोहन आणि विवेकआणि मुलगी संध्याला घेऊन माहेरी आली होती.

रात्री घरात नूडल्स आणि भात खाऊन सर्व जण झोपी गेले. काही वेळा नंतर सीमा, तिची तिन्ही मुले आणि बहीण संजू आणि वाहिनी संजनाची प्रकृती बिघडली. शुक्रवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडले. घरी आल्यावर कुटुंबातील सदस्यांची प्रकृती खालावली. यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले.
सीमाच्या मुलाने रोहन ने पोट दुखीची तक्रार करत पाणी प्यायला आणि झोपला काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. नंतर इतरांची प्रकृती देखील खालावली. सकाळी सर्वांना रुग्णालयात दाखल केले. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे सर्वांची प्रकृती बिघडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

घटनेची माहिती मिळतातच आरोग्य विभागाचे दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अनेक ठिकाणांहून नूडल्सचे नमुने घेतले.हजारा पोलिस स्टेशनचे प्रभारी परमेंद्र सिंह यांनी सांगितले की, अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.पुढील तपास सुरु आहे. 

Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Brain Eating Amoeba ने घेतला 14 वर्षाच्या मुलाचा जीव, जाणून घ्या किती धोकादायक आहे

1 रुपयात पीक विमा योजनेसाठी अर्ज करताय? मग आधी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था स्थिर, अर्थसंकल्पात दिलेल्या सवलती निवडणूक नौटंकी नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण

कांद्याच्या दरावर सरकार पकड घट्ट करणार, अनेक शहरांमध्ये कांद्याने 50 रुपयांचा टप्पा ओलांडला

पुढील लेख
Show comments