Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडात ढगफुटी,4 ठार, 40 ते 50 बेपत्ता

Webdunia
बुधवार, 28 जुलै 2021 (10:31 IST)
जम्मू विभागातील किश्तवाड्यातील गुलाबगड चशौती आणि  हंजंर भागात ढगफुटी मुळे भयानक कहर झाला आहे.आज पहाटे हंजंर येथे ढगफुटी झाली, त्यामुळे 12 घरे मातीमध्ये दबली गेली.
 
या घरात राहणाऱ्या कुटूंबातील सुमारे 40 ते 50 सदस्य अद्याप बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.मात्र, 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. संपूर्ण भागात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
 
याबाबत माहिती देताना डी.सी. किश्तवाड म्हणाले की, हंजंर गाव हा सुमारे 20 किमी लांबीचा डोंगराळ भाग आहे. या दुर्गम भागात वाहतुकीची सुविधा नाही. बचाव दल मदत करायला निघाला आहे परंतु त्यांना तिथ पर्यंत पोहोचण्यास थोडा वेळ लागू शकतो. म्हणूनच तिथल्या वास्तविक परिस्थितीबद्दल काहीही सांगता येत नाही.
 
आजूबाजूच्या भागातून अशीच माहिती मिळाली आहे की, हंजंरमधील 12 घरांचे हे शहर पूर मुळे पूर्णपणे वाहून गेले आहे. हे 4 मृतदेह बचाव पथकाला वाटेत सापडले आहेत. आतापर्यंत बचावकार्य स्थानिक लोकच करीत आहेत. लवकरच लष्कराचे जवान आणि बचाव दल घटनास्थळी पोहोचतील.
 

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments