Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'या' कारणामुळे वाढतेय थंडी

Webdunia
शनिवार, 29 जानेवारी 2022 (18:22 IST)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस आणखी थंडीचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातही तुलनेने थंडी जास्त आहे. पण, यामागचं नेमकं कारण काय आहे?
 
यावेळी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या वेळी आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि तीव्र थंडीचा काळ दिसला आहे. विशेष म्हणजे हिवाळा हंगाम सुरू होण्याआधीच हवामान खात्याने ला नियामुळे यंदा उत्तर भारतात थंडीचा काळ लांबणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. इतकेच नाही तर उत्तर भारतातही यंदाच्या हिवाळ्यात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला. याशिवाय दिल्ली आणि उत्तर भारतात दिसणारे धुके यंदाही खूपच कमी होते.
 
कमाल तापमानही अत्यंत कमी
यंदाचा हिवाळा जास्त थंड आणि लांबला आहे. उशिरापर्यंत धुकेही दिसत होते. त्याचवेळी, यावेळी ढगही जास्त असून बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा प्रकोप आहे. 
 
या भागातही अशीच परिस्थिती
यावेळी धुक्याची चादर आता सुरू झाली आहे. पुढील दोन दिवस दाट धुके पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राजस्थान, ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये गडद धुके आणि थंडी दिसून येईल, असेही विभागाने म्हटले आहे.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments