Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गांधीजींच्या हत्येचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला ?

Webdunia
महात्मा गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला तर सर्वाधिक नुकसान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) झाल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले. महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेचे संघाशी संबंध असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिले. मी देशातील नागरिकांना आणि माध्यमांना विचारू इच्छिते की, गांधीजींच्या हत्येचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला ?. आम्ही तुरूंगात गेलो, आमच्यावर बंदी लादण्यात आली आणि आजही आम्ही त्रास सहन करत आहोत. 
 
देशाला त्रास भोगावा लागला. संघ आणि जनसंघालाही यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला, असे त्यांनी म्हटले.
 
महात्मा गांधींच्या हत्येचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला झाला. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे विसर्जन करून नवीन राजकीय संघटना उभी केली पाहिजे, अशी घोषणा गांधीजींनी केली होती, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments