Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजस्थानमध्ये भूकंपाचे धक्के, बाडमेरचे बालोत्रा ​​हे मुख्य केंद्र

earthquake
, मंगळवार, 24 सप्टेंबर 2024 (16:01 IST)
राजस्थानच्या बालोत्रा ​​जिल्ह्यात दुपारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.2 इतकी होती. लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, बालोत्रा ​​येथे दुपारी 1.43 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 3.2 होती. भूकंपाचा केंद्रबिंदूही बालोत्रा ​​होता. सुमारे 5 किलोमीटर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.सुदैवाने कोणतीही जनधन हानी झाली नाही

भूकंप कशामुळे येतात?
पृथ्वीचं कवच एकसंध नाही तर अनेक टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे भूपट्टांनी मिळून बनलं आहे. या भूपट्टांच्या सीमा जिथे एकमेकांना भिडतात, तिथे भूगर्भीय हालचालींची तीव्रता जास्त असते. या प्लेट्स एकमेकांशी घासतात, एकमेकांपासून दूर जातात किंवा कधी एक प्लेट दुसऱ्या प्लेटवर चढते. वर्षाला जास्तीत जास्त 1 ते 10 सेंटीमीटर एवढ्या मंद गतीनं ही हालचाल होत असते. पण कधीकधी त्यातही अडथळा येऊन दबाव निर्माण होतो.
 
मग अचानक तो दबाव मोकळा होतो, तेव्हा त्यातून मोठा भूकंप येऊ शकतो. पृथ्वीवर असे तीन मुख्य प्रदेश आहेत जिथे मोठ्या भूपट्टांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात होत आहेत. पॅसिफिक रिंग ऑफ फायर, मिड अटलांटिक रिज आणि अल्पाईड बेल्ट म्हणजे आल्प्सपासून हिमालयापर्यंतचा पट्टा. अल्पाईड बेल्टच्या पूर्व भागात भारतीय भूपट्ट ही युरेशियन प्लेटखाली जाते आहे, त्यातून हिमालय पर्वत आणि उत्तर भारताचा भाग, अंदमान आणि कच्छचं रण तसंच तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये भूकंप होतात.
 
युरोपचा दक्षिण भाग, तुर्की, सीरिया, इराण हे देशही याच अल्पाईड बेल्टमध्ये आहेत. पण भूपट्टांच्या हालचाली कमी असलेल्या ठिकाणीही भूकंप येऊ शकतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात लातूर आणि कोयनानगरला झालेले भूकंप. खडक आणि मातीतले बदल, ज्वालामुखी आणि लाव्हा रसाच्या हालचाली, जमिनीखालचे पाण्याचे प्रवाह अशा गोष्टींमुळे असे भूकंप निर्माण होऊ शकतात. कधीकधी अणुस्फोट खाणकाम, तेलासाठी केलं जाणारं उत्खनन, मोठ्या धरणांमुळे तयार झालेले तलाव अशा मानवनिर्मिती गोष्टींमुळे भौगोलिक रचनांवर परिणाम होऊन भूकंप येऊ शकतात.
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेसच्या रॅलीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा !