Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना सामना वाचावाच लागतो : संजय राउत

Webdunia
बुधवार, 12 मे 2021 (16:35 IST)
शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी नाना पटोलेंना टोला लगावला आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना सामना वाचावाच लागतो अन् धोरणं बदलावीही लागतात. केंद्रातील नेते सामनाची दखल घेतात. त्यामुळे सामना कोण वाचत नाही यावर लक्ष देऊ नका, असा टोला राऊतांनी नाना पटोले यांना लगावला.
 
“कोण काय म्हणतंय, सामना कोण वाचत नाही त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. सामना हा वाचावाच लागतो मग ते दिल्ली असो की गल्ली असेल…त्यानुसार धोरणंही ठरवावी लागतात. सामना काय करु शकतो हे महाराष्ट्रातील सत्तांतरात पाहिलेलं आहे आणि याआधीही पाहिलेलं आहे. आजही सामनाच्या शिरोभागी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव झळकतंय त्यामुळे तीच ताकद सामनाची आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments