Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खान सरांसह 400 जणांवर FIR

Webdunia
गुरूवार, 27 जानेवारी 2022 (11:30 IST)
पाटणा: RRBNTPC निकालाच्या गोंधळ प्रकरणी पाटणातील प्रसिद्ध खान सर यांच्या विरोधात पत्रकार नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एनटीपीसीच्या निकालाबाबत गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू होते. याप्रकरणी कोचिंग ऑपरेटर खान सर यांच्या विरोधात पाटणा येथील पत्रकार नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पटनावाले खान सरांवर खटला
खान सरांव्यतिरिक्त, एसके झा सर, नवीन सर, अमरनाथ सर, गगन प्रताप सर, गोपाल वर्मा सर आणि बाजार समितीच्या विविध कोचिंग ऑपरेटर्सवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांविरुद्ध भादंवि कलम 147, 148, 149, 151, 152, 186, 187, 188, 330, 332, 353, 504, 506 आणि 120-बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
विद्यार्थ्यांच्या चौकशीत नाव आले
24 जानेवारीला पटना येथील राजेंद्र नगर टर्मिनलवर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला होता. याच प्रकरणी 300 ते 400 अनोळखी लोकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपासात किशन कुमार, रोहित कुमार, राजन कुमार आणि विक्रम कुमार या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांसमोर दिलेल्या जबाबाच्या आधारे खान सर आणि इतर कोचिंग संस्था चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
 
निकालावरून तीन दिवस गोंधळ
गेल्या तीन दिवसांपासून आरआरबी एनटीपीसी निकालाबाबत बिहारमधील विविध शहरांमध्ये गोंधळ सुरू आहे. निकालात हेराफेरीचा आरोप करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त उमेदवारांनी रेल्वेचे सर्वाधिक नुकसान केले आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, तर अनेक गाड्या बदलाव्या लागल्या. कोचिंग डायरेक्टर खान सरांसह अशा कोचिंग संस्थांवर कारवाई करण्याची तयारी पाटणा जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे, जे विद्यार्थ्यांना साथ देत होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नागपूर : मुलाने फ्रॉड करून विकले घर आणि फ्लॅट, वृद्ध दांपत्यावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली

चित्रपटात दिव्यांगांचा अपमान सहन करणार नाही- सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

रक्षाबंधनाला बहिणींना भेटवस्तू, सर्व अर्थसंकल्पीय योजना कायम- उद्धव यांच्या टोमणेला मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया

दीक्षाभूमि वाद : शमवण्यात येईल बेसमेंट पार्किंग स्थळ, NMRDA आणि स्मारक समिति बैठक मध्ये निर्णय

...तर Pok चे भारतात विलीनीकरण शक्य झाले असते, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे मोठे वक्तव्य

पुढील लेख
Show comments