Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई वांद्रे येथील झोपडपट्टीत भीषण आग ५० पेक्षा अधिक झोपड्या खाक

Webdunia
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (15:55 IST)
वांद्रे येथील नर्गिस दत्त नगरमधील झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अजून पुढे आले नाही. अग्निशमन दलाचे पथक आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी पोहोचले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.आगीत ५० ते ६० झोपड्या जळून खाक झाल्या असून, अद्याप तरी आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अग्निशमन दलातील सूत्रांनी दिली. अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी पोहोचले असून अरुंद रस्त्यांमुळे मोठे अडथळे येत आहेत.
 
वांद्रेमधील गरीबनगर झोपडपट्टीत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही भीषण आग लागली होती. या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले होते. ४ मार्च २०११ सालीही गरीबनगर झोपडपट्टीला आग लागल्यामुळे रहिवासी रस्त्यावर आले होते. या आगी लागतात की लावल्या जातात असे तर्क नागरिक काढत काढत आहेत.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments