Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नियम पाळा किंवा कारवाईस तयार, भारताचा ट्विटरला इशारा

Webdunia
रविवार, 6 जून 2021 (12:04 IST)
भारतातील नव्या माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार भारतात अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ट्विटरला भारत सरकारनं 'अखेरची नोटीस' पाठवलीय. यानंतर ट्विटरकडून कुठले पाऊल उचललं गेलं नाही, तर फौजदारी कारवाईचा इशारा भारत सरकारनं दिलाय. 
 
केंद्र सरकारने फेब्रुवारी 2021 मध्ये लागू केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना 26 मे 2021 पर्यंत भारतात निवासी तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि विभागीय संपर्क अधिकारी यांची नेमणूक करणे आवश्यक होते.

ट्विटरला वारंवार सूचना देऊनही ट्विटरने नियमांच पालन करण्यास नकार दर्शवलाय. त्यामुळे 'अखेरची नोटीस' भारत सरकारकडून पाठवण्यात आलीय.
 
यानंतर अद्याप ट्विटरनं आपली भूमिका जाहीर केली नाहीय. त्यामुळे ट्विटरकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

पुढील लेख
Show comments