Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुढील 5 दिवस उष्णतेची लाट कमी होईल, मात्र महाराष्ट्राच्या तापमानात होणार वाढ

Webdunia
गुरूवार, 5 मे 2022 (12:05 IST)
देशात उन्हाची तीव्रता जाणवत असताना एक दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून जारी अपडेटनुसार वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात सुमारे 2-3 अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली आहे. परिणामी देशात येत्या 5 दिवसांत उष्णतेची लाट कमी होईल.
 
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या म्हणण्यानुसार, राजस्थान, पंजाब, दिल्ली आणि हरियाणाच्या कमाल तापमानात गेल्या 24 तासांत 2-4 अंश सेल्सिअसने घट झाली आहे. हवामान खात्याने हिमाचल प्रदेशात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकेल. दरम्यान, सिमल्यासह राज्यातील अनेक भागात पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे तेथील तापमान खाली आले आहे. 
 
महाराष्ट्राच्या तापमानात होणार वाढ
बुधवारपासून महाराष्ट्रातील कमाल तापमानात 2-4 अंश सेल्सिअसने वाढ होईल असे हवामान खात्याने संगितले आहे. तर देशाच्या इतर भागात कोणताही विशेष बदल हवामानात होणार नाही. महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लात जोरात असून काही भागात तापमानाने 44 अंशाचा पारा गाठला आहे. त्यात कमाल तापमानात 2-4 अंश सेल्सिअसची वाढ होणार असल्याने चिंता वाढली आहे.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

पुढील लेख
Show comments