Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताने आपले अनमोल रत्न गमावले : मोदी

Webdunia
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018 (09:09 IST)
अटल बिहारी वाजपेयी यांच्या रुपाने भारताने आपले अनमोल रत्न गमावले आहे. आज आमच्याकडे शब्द नाहीत. अटलजींच्या निधनाने  एका पर्वाचा अस्त झाला आहे. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालीय ती कधीच भरुन येणार नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. अटलजींच्या निधनाने देशाचे न भरुन येणार नुकसान झाले आहे. ते नेते, वक्ते, ओजस्वी कवी, पत्रकार होतेच पण त्याचबरोबरीने अटलजी भारतमातेचे खरे सुपूत्र होते. त्यांच्याकडून मला वडिलांसारखे प्रेम मिळाले. आज डोक्यावरुन वडिलांचे छत्र हरपल्याची माझी भावना आहे. असे पंतप्रधान मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले.
 
अटलजींचे विराट व्यक्तिमत्व आणि त्यांच्या निधनाचे दु:ख शब्दांमध्ये मांडता येणार नाही. अटलजींनी मला संघटना आणि शासन दोघांचे महत्व समजावले. अटलजींच्या जाण्यामुळे माझ्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही असे मोदी म्हणाले. अटलजींनी भाजपाचा विचार सर्वदूर लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांचा निश्चच आणि मेहनतीमुळेच भाजपा आज इथवर येऊन पोहोचला आहे असे मोदींनी सांगितले. अटलजी आज आपल्यात नसले तरी त्यांची वाणी, विचार नेहमीच भारतीयांना प्रेरणा देत राहील असे मोदी म्हणाले. 
 

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

पुढील लेख
Show comments