suvichar

काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Webdunia
गुरूवार, 22 जून 2017 (11:09 IST)
जम्मू काश्मीरमध्ये दक्षिण भागातील पुलवामा जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. 

मारले गेलेले दहशतवादी हे 'लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेचे आहेत. दहशतवाद्यांकडून ३ एके-४७ रायफल्ससह  दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे. ही चकमक पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा स्थित न्यू कालोनी भागात झाली.  
 
गस्तीवर असणाऱ्या जवानांना पाकव्याप्त काश्मीरमधून काही दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसले. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात ३  दहशतवादी ठार झाले. या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे.
 
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments