आपल्या सैन्याने पुन्हा एकदा आपली वीरता दाखवली असून आपल्या देशात घुसखोरी केलेल्या दहशतवाद्याना ठार केले आहे.जम्मू काश्मीरच्या बांदीपुरामध्ये पहाटे 4 वाजता दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला. हा हल्ला परतवून लावत चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. तर आपले देश प्रेम दाखवत आपल्या सैनिकांनी आनंदात भारत माता की जय अश्या घोषण दिल्या आहेत. हा भयानक हल्ला होता तर पूर्ण पणे आत्मघाती होता. त्यामुळे आपल्या सैनिकांनी फार शिताफीने याला उत्तर दिले आहे.तर या सर्व आतंकवादीना मारल्यावर आता आयचा भागात सैनिक पेट्रोलिंग आणि सर्च ऑपरेशन सुरु केल असून अजून अतेरेकी मारले जाणायची दाट शक्यता भारतीय सैन्य दलाने बोलून दाखवली आहे.