Marathi Biodata Maker

पुन्हा तेच, उत्तर प्रदेशात २४ तासांमध्ये १६ बालकांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (11:43 IST)

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बाबा राघव दास रुग्णालयात गेल्या २४ तासांमध्ये १६ बालकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या १६ बालकांपैकी १० बालकांवर एनआयसीयूमध्ये उपचार सुरु होते. तर उर्वरित ६ बालकांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

मेंदूशी संबंधित आजारांमुळे आतापर्यंत गोरखपूर आणि शेजारीत भागांमध्ये अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये १६ बालकांनी जीव गमावल्यामुळे बाबा राघव दास रुग्णालयात मृत पावलेल्या बालकांची संख्या ३१० वर पोहोचली आहे. याशिवाय गेल्या २४ तासांमध्ये बाबा राघव दास रुग्णालयात २० बालकांना उपचारांसाठी दाखल करुन घेण्यात आले आहे. यामध्ये देवोरियातील ६, खुशीनगरमधील २, गोरखपूर आणि महाराजगंज येथील प्रत्येकी ४, बस्ती आणि बलरामपूर येथील प्रत्येकी एका बालकाचा समावेश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments