Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा तेच, उत्तर प्रदेशात २४ तासांमध्ये १६ बालकांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (11:43 IST)

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बाबा राघव दास रुग्णालयात गेल्या २४ तासांमध्ये १६ बालकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या १६ बालकांपैकी १० बालकांवर एनआयसीयूमध्ये उपचार सुरु होते. तर उर्वरित ६ बालकांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

मेंदूशी संबंधित आजारांमुळे आतापर्यंत गोरखपूर आणि शेजारीत भागांमध्ये अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये १६ बालकांनी जीव गमावल्यामुळे बाबा राघव दास रुग्णालयात मृत पावलेल्या बालकांची संख्या ३१० वर पोहोचली आहे. याशिवाय गेल्या २४ तासांमध्ये बाबा राघव दास रुग्णालयात २० बालकांना उपचारांसाठी दाखल करुन घेण्यात आले आहे. यामध्ये देवोरियातील ६, खुशीनगरमधील २, गोरखपूर आणि महाराजगंज येथील प्रत्येकी ४, बस्ती आणि बलरामपूर येथील प्रत्येकी एका बालकाचा समावेश आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments