rashifal-2026

लालू प्रसाद यादव यांचा टोमणा भाजपचे तारुण्य आता संपले

Webdunia
शनिवार, 20 मे 2017 (12:43 IST)
राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी भाजपवर टोमणा मारला आहे की भाजपचे तारुण्य संपले आहे, त्यामुळे एनडीएचे हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळही पूर्ण करु शकणार नाही.  
 
बेहिशेबी संपत्ती प्रकरणी आयकर विभागाने नुकतेच लालू प्रसाद यादव यांच्या 22 ठिकाणांवर छापे मारले होते. यानंतर आज पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलताना लालू प्रसाद यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. गेलेले तारुण्य कधीही परत येत नाही, मग तुम्ही कितीही तूप-रोटी खा किंवा दुसरे काही खा, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. आयकर विभागाने केलेल्या छापेमारीमुळे लालू प्रसाद यादव चांगलेच भडकले आहेत. त्यामुळे त्यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला. ज्यांनी अब्जावधी रुपये लुटले ते आता आमच्यावर आरोप लावत आहेत. असे म्हणत लालू प्रसाद यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपला दिल्लीतून हटवेन तेव्हाच मी शांत बसेन. असेही यावेळी लालू प्रसाद म्हणाले. एनडीए सरकारने तीन वर्षात एवढे गुन्हे केले आहेत की, ते आता पाच वर्षही पूर्ण करु शकणार नाहीत. 27 ऑगस्टला समान विचारधारा असणारे पक्ष एक रॅली काढणार आहेत. असेही लालूंनी यावेळी सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments