Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनिल देशमुख यांचा महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून राजीनामा, 100 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप

Webdunia
सोमवार, 5 एप्रिल 2021 (15:02 IST)
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी यापूर्वी पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुख सर्वांच्या निशाण्यांवर होते. सोमवारी जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्यांविरुद्ध सीबीआय चौकशीला मंजुरी दिली तेव्हा अनिल देशमुख यांनी त्यांचे पद सोडले आहे.
सीबीआय चौकशीला मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिली
सांगायचे म्हणजे की या प्रकरणात परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात संपर्क साधला होता. या आरोपांची चौकशी सीबीआयने करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी सकाळी दिले होते. पुढील पंधरा दिवसांत सीबीआयला प्रारंभिक अहवाल द्यावा लागेल, त्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर एफआयआर दाखल होणार की नाही याचा निर्णय घेतला जाईल.

संबंधित माहिती

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments