Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mainpuri :वधू-वरांसह घरात झोपलेल्या पाच जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या

Webdunia
शनिवार, 24 जून 2023 (14:12 IST)
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे घरात झोपलेल्या पाच जणांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर आरोपीने स्वतः आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

मैनपुरीच्या किश्नी पोलीस स्टेशन हद्दीतील गोकुलपुरा अरसारा गावात शनिवारी सकाळी एकाच कुटुंबातील पाच जणांची सामूहिक हत्या झाल्याने परिसर हादरला. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. 
 
गावातील शिववीर सिंह याने दोन भाऊ, पत्नी, मित्र, भावाची नवविवाहित पत्नीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली . नंतर त्यानेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. तीन जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळपूर अरसारा गावात राहणारे सुभाषचंद्र यादव यांना शिववीर, सोनू आणि भुल्लन ही तीन मुले होती. शुक्रवारी मधला मुलगा सोनू (20) याच्या लग्नाची मिरवणूक इटावा पोलीस ठाण्याच्या चौबिया भागातील गंगापूर गावातून परतली होती.  
 
नवीन सून सोनी (20) हिच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण होते. शुक्रवारी रात्री एक वाजेपर्यंत सर्वजण डीजे वाजवून नाच -गाणे करत होते. रात्री शिववीरने कोल्ड्रिंकमध्ये काही नशेची गोळी मिसळून सर्वांना दिली. सर्वजण बेशुद्ध पडल्यानंतर शिववीरने बांके येथून अंगणात झोपलेला भाऊ भुल्लन (20), मेहुणा सौरभ रा. चंदा हविलिया (26), भावाचा मित्र दीपक (20) फिरोजाबाद यांचा खून केला. 
 
यानंतर टेरेसवर झोपलेल्या सोनू (22) आणि नवविवाहित सोनी यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. या हल्ल्यात आरोपीचे वडील सुभाष, पत्नी आणि मामी गंभीर जखमी झाले आहेत. पाच खून केल्यानंतर शिववीरने घरापासून काही अंतरावर जाऊन स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. 
 
या हत्याकांडाची माहिती मिळताच एसपी विनोद कुमार आणि अनेक पोलिस ठाण्यांचा फौजफाटा गावात पोहोचला. दोन जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ही हत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस कारणांचा तपास  करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

पुढील लेख
Show comments