Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विमान दुर्घटनेत थोडक्यात बचावले १३६ प्रवासी

Webdunia
शनिवार, 8 सप्टेंबर 2018 (09:23 IST)
मालदीवमध्ये एअर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त होण्यापासून थोडक्यात बचावले आहे. यात वैमानिकाच्या चुकीमुळे हे विमान चुकीच्या धावपट्टीवर उतरले. या धावपट्टीचे काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. तिरुवनंतपुरमवरून माले असा प्रवास करणाऱ्या या विमानामध्ये १३६ प्रवासी होते. बांधकाम पूर्ण न झालेल्या धावपट्टीवर विमान उतरवल्यामुळे विमानाचे दोन टायर्स फुटले. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. 
 
एअर इंडियाच्या माहितीनुसार, AI263 हे विमान चुकीचा संदेश मिळाल्याने माले वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बांधकाम सुरु असलेल्या धावपट्टीवर उतरले. दरम्यान, या विमानातून प्रवास करणारे १३० प्रवाशी आणि क्रू मेंबर्स पूर्णतः सुरक्षित आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून वैमानिकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments