Dharma Sangrah

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञा सिंह सह अन्य आरोपींवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप

Webdunia
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018 (07:57 IST)
मोठी बातमी असून महाराष्ट्र आणि देशाला धक्का देणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. बॉम्बस्फोटांप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित याच्यासह अन्य आरोपीविरोधात मंगळवारी एनआयएकडून आरोप निश्चित करण्यात आले. २००८ साली मालेगाव येथे बॉम्बस्फोट घडवला गेला होता. साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहितसह अन्य सात आरोपींविरोधात दहशतवादी कट आखणे, हत्या आणि अन्य आरोप ठेवण्यात आले आहेत. आपल्याविरोधात आरोप निश्चित करण्याला स्थगिती देण्यासाठी कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य व्यक्तींनी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने सोमवारी फेटाळून लावली होती. आरोप निश्चित होताच सर्वांनी त्यांच्यावर आरोपाचा इन्कार केला आहे. आम्ही हे केलेच नाही असे स्पष्टीकर दिले आहे.मालेगावमधील भिक्कू चौक येथील मशिदीजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १००हून अधिक लोक जखमी झाले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

पुढील लेख
Show comments