Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञा सिंह सह अन्य आरोपींवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप

Webdunia
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018 (07:57 IST)
मोठी बातमी असून महाराष्ट्र आणि देशाला धक्का देणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. बॉम्बस्फोटांप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित याच्यासह अन्य आरोपीविरोधात मंगळवारी एनआयएकडून आरोप निश्चित करण्यात आले. २००८ साली मालेगाव येथे बॉम्बस्फोट घडवला गेला होता. साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहितसह अन्य सात आरोपींविरोधात दहशतवादी कट आखणे, हत्या आणि अन्य आरोप ठेवण्यात आले आहेत. आपल्याविरोधात आरोप निश्चित करण्याला स्थगिती देण्यासाठी कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य व्यक्तींनी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने सोमवारी फेटाळून लावली होती. आरोप निश्चित होताच सर्वांनी त्यांच्यावर आरोपाचा इन्कार केला आहे. आम्ही हे केलेच नाही असे स्पष्टीकर दिले आहे.मालेगावमधील भिक्कू चौक येथील मशिदीजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १००हून अधिक लोक जखमी झाले होते.

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

पुढील लेख
Show comments