Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदींकडून देशातील जनतेचा विश्वासघात

Webdunia
गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (14:37 IST)
खोटे बोलणे, बढाया मारणे, विरोधकांना धमकावणे हे मोदी सरकारचे तत्वज्ञान आहे, त्यांनी देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे, अशा शब्दांत यूपीएच्या अध्यक्षा आणि वरिष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. बुधवारी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या संयुक्त बैठकीत बोलताना त्यांनी सरकारची कार्यपद्धती, रोजगार आणि सामाजिक सलोखा याबाबतची गेल्या पाच वर्षातील कामगिरीवरुन मोदींना ब्लफमास्टर असे संबोधत जोरदार टीकाकेली.
 
सोनिया म्हणाल्या, मोदी सरकारने 2014 मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत, त्यामुळे त्यांनी देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. मोदी सरकारमध्ये संसद अस्वस्थ आणि कमकुवत बनली आहे. वादविवाद आणि चर्चा गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. राहुल गांधी हे सध्या विविध महत्वाच्या मुद्द्यावरुन मोदींना घेरत आहेत. या पार्श्वभूमीवर सोनिया यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. बेरोजगारी, नोटाबंदीचा घोटाळा, राफेल डीलमुळे  मोदी सरकारची विश्वासार्हता लयाला गेली असल्याचे सोनिया यावेळी म्हणाल्या.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments