rashifal-2026

भागवतांचे वक्तव्य संघाची मानसिकता - पाटील

Webdunia
भारतीय सैन्यापेक्षा कमी वेळात संघाचे स्वयंसेवक दोन दिवसांत युद्धासाठी सज्ज होतील, असे वक्तव्य करुन रा.स्व.सं.चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताचे सैन्य आणि कोट्यवधी भारतीयांचा अवमान केला आहे. या वक्तव्यावरूनच संघाची मानसिकता उघडी पडली असल्याची टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते  पाटील यांनी केली आहे. भागवतांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्यभर निदर्शने केली आहेत.
 
अहोरात्र मेहनत घेऊन भारतीय सैनिक देशाचे संरक्षण करत असतात. भागवतांचे वक्तव्य सैन्यदलाचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे. त्यामुळे भागवत यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी युवकचे औरंगाबाद शहराध्यक्ष दत्ता भांगे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर, नाशिक शहराध्यक्ष अंबादास खैरे, अहमदनगर शहराध्यक्ष अभिजीत खोसे यांच्या नेतृत्वाखाली वरील शहरात आंदोलने झाली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments