Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशाला कुणा एका कुटुंबामुळे स्वातंत्र्य मिळालेले नाही - पंतप्रधान

Webdunia
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017 (08:53 IST)
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करण्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला.  भाषणाच्या सुरूवातीस त्यांनी सोमवारी रात्री दिल्ली येथे झालेल्या भूकंपाबद्दल संवेदना व्यक्त करत अखेर भूकंप झालाच असे म्हणत, यामागे काहीतरी कारण असेल असे म्हणत प्रारंभीच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. भाषणात मोदींनी सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदीसह त्यांच्या सरकारने सामान्य माणसांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा यशाची माहिती दिली. काँग्रेसचे नेते मल्लिकर्जून खरगे यांनी   पंतप्रधानांवर  केलेल्या टीकेला उत्तर देत  देशाला कुणा एका कुटुंबामुळे स्वातंत्र्य मिळालेले नाही. यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचा त्याग केला आहे. परंतु यांच्या तोंडून कधी भगत सिंग किंवा चंद्रशेखर आझाद यांचे नाव कसं काय निघत नाही, असा सवाल केला.  
 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments