Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काँग्रेस शेवटच्या घटका मोजत आहे: मोदी

Webdunia
जालंधर- काँग्रेस हा पक्ष सध्या शेवटच्या घटका मोजत असून सत्तेविना या पक्षाची अवस्था पाण्याशिवाय तडफडणार्‍या माशासारखी झाल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जी बोट बुडाली आहे, ज्या बोटीत आता काहीच उरले नाही अशा बोटीमध्ये पंजाबची जनता पाय ठेवणार का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पंजाबमध्ये अकाली दल- भाजप युतीला मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
 
पंजाबमधील तरूणाई अमील पदार्थांच्या विळख्यात अडकली असून यासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावर मोदी यांनी प्रत्युत्तर दिले की पंजाब ही वीरांची भूमी आहे. पंजाबची आन बान आणि शानमुळे देशाची मान अभिमानाने उंचावते असे सांगत मोदी म्हणाले, काही लोकांनी राजकीय स्वार्थापोटी पंजाबमधील तरुणंची प्रतिमा मलिन केली, असेही ते म्हणाले.

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

पुढील लेख
Show comments