Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंडिया नाही, आता भारत होईल का? इंडिया' शब्द काढून टाकल्याचा काँग्रेसचा मोदी सरकारवर आरोप

Webdunia
मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (16:31 IST)
G-20 परिषदेपूर्वी काँग्रेसने केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दावा केला आहे की राष्ट्रपती भवनाने 9 सप्टेंबर रोजी जी-20 शिखर परिषदेच्या रात्रीच्या जेवणासाठी पाठवलेल्या निमंत्रण पत्रांमध्ये सामान्यतः वापरला जाणारा 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' बदलण्यात आला आहे. त्यात इंडिया हा शब्द काढून 'प्रेसिडेंट ऑफ भारत' वापरण्यात आल्याचा दावा रमेश यांनी केला आहे. 
<

Mr. Modi can continue to distort history and divide India, that is Bharat, that is a Union of States. But we will not be deterred.

After all, what is the objective of INDIA parties?

It is BHARAT—Bring Harmony, Amity, Reconciliation And Trust.

Judega BHARAT
Jeetega INDIA! https://t.co/L0gsXUEEEK

— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 5, 2023 >
संविधानाचा संदर्भ देत जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे,"त्याच्या कलम 1 मध्ये असे म्हटले आहे की भारत, जो इंडिया होता, तो राज्यांचा संघ आहे. परंतु आता राज्यांच्या संघावरही हल्ला होत आहे." असे त्यांनी म्हटले आहे. 
 
या संपूर्ण वादावर शशी थरूर म्हणाले की, इंडियाला भारत म्हणण्यास घटनात्मक आक्षेप नाही. हे देशाच्या दोन नावांपैकी एक आहे. मला आशा आहे की शतकानुशतके ब्रँड व्हॅल्यू असलेले इंडिया  हे नाव पूर्णपणे काढून टाकण्या इतके सरकार मूर्ख ठरणार नाही. आपण दोन्ही नावे वापरणे सुरू ठेवले पाहिजे. जगभर ओळखले जाणारे नाव. 
 
काँग्रेसचे प्रमोद तिवारी यांनी देखील इंडियाच्या नामांतराच्या अटकळीवर भाष्य केले. ते म्हणाले, त्यांना इंडिया  या शब्दाची भीती वाटते. ते संविधान बदलण्याच्या मर्यादेपर्यंत जातील का? संविधानात लिहिले आहे, इंडिया म्हणजे हा भारत'... भाजपमधील भीती मोदीजींची भीती दाखवते. इथे INDIAची निर्मिती झाली आणि दुसरीकडे भाजपचे गाठोडं बांधू लागले. ... तुम्ही 'इंडिया' हा शब्द पृथ्वीवरून पुसून टाकू शकत नाही. आम्हाला आमच्या भारताचा आणि इंडियाचा अभिमान आहे."
 
G-20 निमंत्रणाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अशोकस्तंभाच्या खाली प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या जागी प्रेसिडेंट ऑफ भारत हा शब्द वापरण्यात आला आहे. G-20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 9 सप्टेंबर रोजी रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण आहे. 


Edited by - Priya Dixit     
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

पुढील लेख
Show comments