Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्या बाबाला हव्या आहेत १६ हजार बायका

/police-raid-in-ashram-of-baba-virendra-dev-dixit-in-rohini
Webdunia
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (16:20 IST)
देशात भोंदू  बाबांचे स्तोम आले असून नागरिकही या बाबांच्या आहारी जात आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे. नवी दिल्लीतल्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी गुरुवारी रात्री रोहिणी भागातील एका आश्रमातून ४० मुलींची सुटका केली आहे. यामध्ये वृत्त असे की स्वयंघोषित संत विरेंद्र देव दीक्षितच्या आश्रमातून या मुली सोडवल्या आहेत. वाईट असे की त्याला १६ हजार बायका त्याच्या सोबत हव्या आहेत. जसे भगवान श्रीकृष्णांनी १६ सहस्त्र नारींना पत्नीचा दर्जा दिला होता या आख्यायिकेला प्रमाण मानत स्वत:ला ईश्वरी अवतार भासवणाऱ्या या बाबालाही १६ हजार महिलांची संगत हवी असे तो म्हणतो. एकदा का आश्रमात दाखल झाल्या की या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात येत  होते. कोर्टाने त्याच्या तपासाचे आदेश दिले होते. जेव्हा मुलीना बाहेर काढले तेव्हा त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर आत्यचार झाले असे समोर आले आहेत. लवकरच याबबावर कारवाई होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

पुढील लेख
Show comments