suvichar

पंतप्रधान मोदींनी मान्य केला पराभव

Webdunia
बुधवार, 12 डिसेंबर 2018 (11:40 IST)
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी यांनी पराभव मान्य केला असून काँग्रेसला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही जनतेचा जो कौल आहे त्याचा नम्रतेने स्वीकार करतो. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या जनतेने आम्हाला त्यांची सेवा करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
या राज्यातील भाजप सरकारांनी जनतेच्या कल्याणासाठी अथक मेहनत घेतली असे मोदी यांनी म्हटले आहे. मोदींनी तेलंगणामधील विजयासाठी तेलंगणा राष्ट्र समिती आणि मिझोरममधील मिझो नॅशनल   फ्रंटलाही विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
या विधानसभा निवडणुकांसाठी भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबाने दिवस-रात्र मेहनत केली. मी त्यांच्या मेहनतीला सलाम करतो. जय आणि पराजय हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. जनतेची सेवा करण्याचा आमचा संकल्प आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments