rashifal-2026

राम मंदिर निर्माणासाठी आता आंदोलन नाही

Webdunia
सोमवार, 26 मार्च 2018 (10:37 IST)
राम मंदिर निर्माण करण्यासाठी  अयोध्येत  आता कुठलेही आंदोलन करण्यात येणार नाही, कोणीही कार्यकर्ता पोलिसांची गोळी खाणार नाही, कोणी ही तुरुंगात जाणार नाही, तर राम मंदिर निर्माण करण्याची जबाबदारी आता केंद्र सरकारची  आहे. या सरकारने संसदेत कायदा करावा आणि  अयोध्येत राम मंदिर निर्माण करावे. अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली असून ती जाहीर केली आहे. तोगडिया  नागपुरात बोलत होते.   तोगडिया यांनी  राम मंदिरासंदर्भात संसदेत कायदा करावा या मागणीसाठी पंतप्रधान यांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. देशातील 20 कोटी बेरोजगार युवकांना रोजगार मिळाने गरेजेचे असून यामध्ये  सर्वांना शिक्षण  मिळावे तर सोबत  शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशीही मागणी डॉ. तोगडिया यांनी यावेळी केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments