Festival Posters

मुंबईला यातना देणाऱ्यांना मुंबईकर आता घरी बसवतील - शरद पवार

Webdunia
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (10:41 IST)
आज सत्तेत बसलेल्या घटकांचे निर्णय देशाला, राज्याला आणि मुंबईकरांना यातना देणारे असल्याचे खासदार शरद पवार  यांनी मुंबई येथील परिवर्तन सभेत सांगितले. कशाला महत्व द्यायचे आणि किती द्यायचे याचा विचार राज्यकर्त्यांनी करायचा असतो. आज मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांना किती यातना होतात, हे मी सांगायची गरज नाही. जसा निवाऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा असतो तसा दळणवळणाचा आणि मुंबईकरांसाठी लोकलचा प्रश्न महत्वाचा आहे. यासाठी दळणवळणाची गाडी सुरळीत धावली पाहिजे. पण मुंबईकरांच्या यातना सरकारला दिसत नाहीत. त्यांना मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन दिसते. ९८ हजार कोटी रूपये खर्च करून त्यांना अहमदाबादला जायची घाई लागली आहे. मुंबई लोकलसाठी आठ हजार कोटी खर्च केले, तर मुंबईकरांचे प्रश्न सुटतील.
 
९८ हजार कोटी रूपयांत मुंबई-दिल्ली, दिल्ली-कलकत्ता आणि कलकत्ता-चेन्नई या सर्व ठिकाणच्या ट्रेन धावू शकतात. पण त्याकडे पंतप्रधान साहेबांचे लक्ष नसल्याची टीका पवार यांनी यावेळी केली. मुंबईच्या दळणवळणासाठी वेळीच निधी खर्च केला नाही तर मुंबईकरांच्या यातना वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यातना देणाऱ्यांना बाजूला करण्याचा निर्णय मुंबईकरांना आता घ्यावा लागेल, असे आवाहन पवार यांनी मुंबईकरांना केले.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments