शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत असताना, आज (शनिवार) हरियाणामध्ये पोलिसांकडून शेतकर्यांदवर झालेल्या जबरजस्त लाठीचार्जमुळे वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, हरियाणा पोलिसांच्या या करावाईवरून आता केंद्र सरकारच्या विरोधकांकडून पुन्हा एकदा टीका सुरू झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी या घटनेचा निषेध नोंदवल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.