Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक! आर्ची-परशासारखे दोघांना संपवलं, लग्नानंतर तीन दिवसांनी प्रेमी युगुलाची हत्या

Webdunia
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (23:10 IST)
तामिळनाडूतील एका जोडप्याला प्रेमकरणे खूप  महागात पडले. या जोडप्याने पळून जाऊन घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. त्यानंतर या जोडप्याचा आनंद कोणीतरी हिरावून घेतला आणि तीन दिवसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांची निर्घृण हत्या केली.
 
हे संपूर्ण प्रकरण तामिळनाडूच्या थुथुकुडी येथील मुरुगेसन भागातील आहे. जिथे भरदिवसा घरात घुसून एका जोडप्याची हत्या करण्यात आली. मुरुगेसने येथील रहिवासी 24 वर्षीय मारी सेल्वम आणि थिरू व्ही नागा येथील रहिवासी 20 वर्षीय कार्तिक हे गेल्या दोन वर्षांपासून प्रेम संबंधात  होते. अवघ्या तीन दिवसांपूर्वी म्हणजे 30 ऑक्टोबर रोजी दोघांनीही घरच्यांविरोधात पळून जाऊन लग्न केले आणि मुरुगेसन नगरमध्ये एकत्र राहू लागले. 
 
दोघेही कुटुंबापासून वेगळे राहू लागले. गुरुवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानक पाच अज्ञात जण  त्याच्या घरात शिरले. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना घटनास्थळी माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आरोपी दोन दुचाकीवरून आले होते. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments