Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सात राज्यांच्या राज्यपालांमध्ये फेरबदल

सात राज्यांच्या राज्यपालांमध्ये फेरबदल
Webdunia
बुधवार, 22 ऑगस्ट 2018 (12:58 IST)
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी सात राज्यांच्या राज्यपालांमध्ये फेरबदल केले. त्यानुसार, बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
इतर राज्यांच्या राज्यपालपदी राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्यांमध्ये सत्यदेव नारायण आर्य यांची हरयाणाच्या राज्यपालपदी, बेबी राणी मौर्य यांची उत्तराखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, गंगाप्रसाद यांची मेघालयाच्या राज्यपालपदावरुन बदली करीत सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांची मेघालयाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर हरयाणाचे राज्यपाल कप्तान सिंग सोलंकी यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
सत्यदेव नारायण हे नितिश कुमार सरकारमध्ये मंत्री होते तर लालजी टंडन हे अटलबिहारी वाजपेयींचे निकटवर्तीय आणि उत्तर प्रदेशचे मंत्री राहिलेले आहेत. जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेले सत्यपाल मलिक हे एन. एन. वोहरा यांची जागा घेणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments