Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सात राज्यांच्या राज्यपालांमध्ये फेरबदल

Webdunia
बुधवार, 22 ऑगस्ट 2018 (12:58 IST)
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी सात राज्यांच्या राज्यपालांमध्ये फेरबदल केले. त्यानुसार, बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
इतर राज्यांच्या राज्यपालपदी राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्यांमध्ये सत्यदेव नारायण आर्य यांची हरयाणाच्या राज्यपालपदी, बेबी राणी मौर्य यांची उत्तराखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, गंगाप्रसाद यांची मेघालयाच्या राज्यपालपदावरुन बदली करीत सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांची मेघालयाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर हरयाणाचे राज्यपाल कप्तान सिंग सोलंकी यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
सत्यदेव नारायण हे नितिश कुमार सरकारमध्ये मंत्री होते तर लालजी टंडन हे अटलबिहारी वाजपेयींचे निकटवर्तीय आणि उत्तर प्रदेशचे मंत्री राहिलेले आहेत. जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेले सत्यपाल मलिक हे एन. एन. वोहरा यांची जागा घेणार आहेत.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments