suvichar

नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आणखीन एक संधी

Webdunia
शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (12:25 IST)

येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववी व दहावीच्या तीन विषयांची नैदानिक चाचणी घेण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे दहावीची बोर्डाची परीक्षा असतानादेखील ही नैदानिक चाचणी घेण्यात येणार आहे. तर या शैक्षणिक वर्षात जे नववीचे विद्यार्थी नापास झाले आहेत त्या विद्यार्थ्यांची जून महिन्यात पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाणार आहे.

शासनाने यापूर्वीच नववी दहावीसाठीही नैदानिक चाचण्या घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र याची अंमलबजावणी कधीपासून होईल व कोणकोणत्या विषयांसाठी ही चाचणी घेण्यात येईल याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र आता शासनाने येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार जुलै महिन्यात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणी घेण्यात येणार असल्याचे शासनाने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments