Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आणखीन एक संधी

Webdunia
शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (12:25 IST)

येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववी व दहावीच्या तीन विषयांची नैदानिक चाचणी घेण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे दहावीची बोर्डाची परीक्षा असतानादेखील ही नैदानिक चाचणी घेण्यात येणार आहे. तर या शैक्षणिक वर्षात जे नववीचे विद्यार्थी नापास झाले आहेत त्या विद्यार्थ्यांची जून महिन्यात पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाणार आहे.

शासनाने यापूर्वीच नववी दहावीसाठीही नैदानिक चाचण्या घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र याची अंमलबजावणी कधीपासून होईल व कोणकोणत्या विषयांसाठी ही चाचणी घेण्यात येईल याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र आता शासनाने येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार जुलै महिन्यात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणी घेण्यात येणार असल्याचे शासनाने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे. 

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments