Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाच रूपयात वरण-भात, भाजी-पोळी आणि पापड

उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
Webdunia
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेवर आल्यापासून नवनवीन निर्णय घेण्याचा धडाका लावल्याचे दिसत आहे. आता ते राज्यातील वंचित व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांसाठी 5 रूपयांत भरपेट जेवण देण्याचा विचार करत आहेत. 
 
या 5 रूपयांच्या थाळीत भात, चपाती, डाळ, एक भाजी आणि पापड असेल. अनेकांना ऐकवेळचे जेवणही मिळत नाही, अशांसाठी हा दिलासादायक निर्णय असेल, असे मत उत्तर प्रदेशाचे दुग्धविकास व सांस्कृतिक मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी मांडले.
 
याबाबत अधिक माहिती देताना चौधरी म्हणाले, मी नुकताच छत्तीसगड येथे दौर्‍यावर गेला होता. त्यावेळी मी तेथील सरकारकडून देण्यात येत असलेल्या 5 रूपयांत मिळणार्‍या थाळीचा आस्वाद घेतला. मी तेथे असताना अनेकवेळा 5 रूपयांत जेवण केले. ते अन्न खूप स्वच्छ, चांगले आणि चवदार होते. मी तेथील स्वच्छतेवरही खूप समाधानी आहे, असे कौतुकही त्यांनी केले.
सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

पुढील लेख
Show comments