rashifal-2026

पाच रूपयात वरण-भात, भाजी-पोळी आणि पापड

Webdunia
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेवर आल्यापासून नवनवीन निर्णय घेण्याचा धडाका लावल्याचे दिसत आहे. आता ते राज्यातील वंचित व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांसाठी 5 रूपयांत भरपेट जेवण देण्याचा विचार करत आहेत. 
 
या 5 रूपयांच्या थाळीत भात, चपाती, डाळ, एक भाजी आणि पापड असेल. अनेकांना ऐकवेळचे जेवणही मिळत नाही, अशांसाठी हा दिलासादायक निर्णय असेल, असे मत उत्तर प्रदेशाचे दुग्धविकास व सांस्कृतिक मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी मांडले.
 
याबाबत अधिक माहिती देताना चौधरी म्हणाले, मी नुकताच छत्तीसगड येथे दौर्‍यावर गेला होता. त्यावेळी मी तेथील सरकारकडून देण्यात येत असलेल्या 5 रूपयांत मिळणार्‍या थाळीचा आस्वाद घेतला. मी तेथे असताना अनेकवेळा 5 रूपयांत जेवण केले. ते अन्न खूप स्वच्छ, चांगले आणि चवदार होते. मी तेथील स्वच्छतेवरही खूप समाधानी आहे, असे कौतुकही त्यांनी केले.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments