Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'या' शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळले

Webdunia
गुरूवार, 14 मार्च 2019 (08:15 IST)
दहावी व बारावीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आले आहे. निवडणूक अधिकारी अ. ना. वळवी यांनी याचे आदेश दिले आहेत. बोर्डाचे पेपर तपासणाऱ्यांना निवडणुकांचे काम देऊ नये, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणुकांच्या कामातून वगळले जावे अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. निवडणुकांच्या कामामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबण्याची भीती होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
 
यासाठी शिक्षक संघटनांनी प्रयत्न केले होते. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने याप्रकरणी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, शिक्षण सचिव व बोर्डाला पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५ जून पूर्वी बोर्डाचे निकाल लावण्यासाठी दहावी व बारावीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी केली होती.

संबंधित माहिती

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुढील लेख
Show comments