Marathi Biodata Maker

उत्तर प्रदेशच्या बरेलीत बस-ट्रकच्या धडकेत 22 लोक जिवंत जळाले

Webdunia
सोमवार, 5 जून 2017 (13:26 IST)
उत्तर प्रदेश राज्य परिवहन मंडळाच्या बसला ट्रकची धडक लागताच आगडोंब उडाला. आगीच्या भडक्यात 22 प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच इतर 15 प्रवाश्यांना उपचारासाठी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे.
 
बरेली जिल्ह्यातील बिथरीचैनपूर परिसरात हा अपघात घडला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीप्रमाणे, रविवारी रात्री उशीरा 2 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-24 वर दिल्लीहून बस येत होती.
 
सुत्रांच्या माहितीनुसार, बस चुकीच्या बाजूने येत होती. त्यामुळे, लखनौच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक आणि बसमध्ये जोरदार धडक बसली. ट्रकची धडक लागताच बसच्या डीझेल टँकमध्ये स्फोट झाला. यानंतर लागलेल्या आगीत काही क्षणांतच बसचा कोळसा झाला.
 
या आगीची माहिती मिळताच पोलिस आणि अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावर पोलिस अधीक्षकांसह इतर पोलिस अधिकारी हजर असून सविस्तर तपास केला जात आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments