Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्दाह चक्रीवादळाचा धोका, तमिलनाडु आणि आंध्रप्रदेशात, अलर्ट जारी

Webdunia
सोमवार, 12 डिसेंबर 2016 (12:00 IST)
बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ वर्दाह आज दुपारपर्यंत चेन्नईत धडकणार आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीतल्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या हे वादळ चेन्नईच्या पूर्वेला १८० किलोमीटरवर आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईसह तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. ताशी ४० ते ५० किमीच्या वेगाने वारे वाहणार आहेत. चेन्नईत अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. या वादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफचे ७ चमू तामिळनाडूत तर ६ चमू आंध्र प्रदेशात तैनात ठेवण्यात आले आहेत. भारतीय वायुसेनेलाही या वादळासंदर्भातला हाय अलर्ट पाठवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तामिळनाडू सरकराने वादळाने प्रभावित होऊ शकतील अशा भागांत आज सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Sarvapitri Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्या बद्दल 10 न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या

शारदीय नवरात्रीचे व्रत करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

गजलक्ष्मी व्रत कथा वाचा, घरात लक्ष्मी नांदेल, सुख-संपत्ती, पुत्र-पोत्रादी आणि कुटुंब सुखी राहील

पितृ दोष म्हणजे काय ? निवारण उपाय जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : 3 की 4 ऑक्टोबर, शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे, घटस्थापनेची शुभ वेळ जाणून घ्या

पुढील लेख
Show comments