Marathi Biodata Maker

'वरदा' नाव पाकिस्तानी! वरदा म्हणजे गुलाब: वादळात आपले नुकसान

Webdunia
बुधवार, 14 डिसेंबर 2016 (09:44 IST)
तामिळनाडून घोंघावत शिरलेल्या चक्रीवादळाच्या नावाचा म्हणजे 'वरदा' या शब्दाचा अर्थ आहे - गुलाब. हा मूळ उर्दू शब्द आहे. या वादळाचे बारसे पाकिस्तानने केले आहे.
 
मागील दहा दिवसांपासून या वादळाचा अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात थायलंडच्या दक्षिणेला हे चक्रीवादळ तयार झाले. 'वरदा'च्या पूर्वी आलेल्या 'हुडहुड' वादळाचे नाव ओमानने ठेवले होते. त्यापूर्वीचे 'फायलीन' नाव थायलंडने सुचवले होते. यंदा नाव ठेवण्याची पाळी पाकिस्तानची होती. आतापर्यंत चक्रीवादळांची ६४ नावे ठेवण्यात आली आहेत. भारताने एका वादळाला 'लहर' हे नाव दिले होते.
कशी झाली सुरुवात?
 
चक्रीवादळाच्या नामकरणाला १९५३ मध्ये अटलांटिक क्षेत्रात झालेल्या करारानुसार सुरुवात झाली. हिंदी महासागरात येणाऱ्या वादळांना नावे देण्याचा प्रस्ताव भारताने मांडला होता. त्यानुसार २००४ पासून हिंदी महासागरातल्या वादळांना आशियातले ८ देश क्रमाक्रमाने नावे सुचवतात. भारत, बांगला देश, पाकिस्तान, म्यानमार, मालदीव, श्रीलंका, ओमान आणि थायलंड या ८ देशांचा त्यांच्या नावांच्या इंग्रजी आद्याक्षरानुसार क्रम लावला जातो. त्यानुसार ते नावे सुचवतात.
 
तामिळनाडूत आलेल्या चक्रीवादळाला वरदा हे नाव पाकिस्तानने ठेवले. चक्रीवादळांना नाव देण्याची परंपरा 20 व्या शतकापासून सुरु झाली.
 
 चक्रीवादळांना एखादं विशिष्ट नाव देण्याचं कारण म्हणजे, चक्रीवादळासंदर्भात दोन देशात माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी मदत होणं हे मुख्य कारणं आहे. माहितीची देवाण-घेवाण करताना जर एकाच चक्रीवादळाला अनेक नावांनी संबोधले तर घोळ होऊ शकतो. तसेच, अनेक अफवा पसरु शकतात. त्यामुळे प्रत्येक देशांने येणा-या चक्रीवादळाला नाव देण्याचं ठरवलं. चक्रीवादळाला नाव देण्याचा करार अटलांटिक क्षेत्रात 1953 साली झाला.
 
भारतानं २००४ साली हिंदी महासागरात येणार्या वादळाला नाव देऊन या परंपरेला सुरूवात केली. भारताच्या भौगोलिक अथवा सागरी क्षेत्रात निर्माण होणार्या चक्रीवादळांना नावं देताना भारतीय हवामान खातं भारतीय उपखंड परिसरातील अन्य देशांच्या वेधशाळांशी संपर्क करते. म्हणजेच ओमान, पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार, थायलंड इत्यादी देशांशी संपर्क करून सर्वांच्या संमतीनं एखादे नाव निश्चित केलं जातं.
 
वरदा या वादळापूर्वी हुडहुड हे वादळ आलं होतं. या वादळाला ओमान या देशानं नाव ठेवलं होतं. त्याआधीच्या वादळाला फायलीन हे नाव थायलंडने दिले होतं. तर, भारतानं आत्तापर्यंत अग्नि, आकाश, बिजली आणि जल अशी नावं दिली आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments