‘टॉक टू एके’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशभरातील जनतेशी संवाद साधला.
या कार्यक्रमात त्यांना फोन, एमएसएस आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांना जनतेने अनेक प्रश्नही विचारले. तब्बल 15 हजार नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारले.
एका नागरिकाने त्यांना विचारले की तुम्ही जनतेला इतके मूर्ख का बनवता? तर काहींनी त्यांना चित्रपटाचे रिव्ह्यू सांगण्यास सांगितले. एकाने तर केजरीवाल यांना कटप्पाने बाहुबलीला का मारले असा प्रश्न केला. या व्यक्तीचे नाव रुपेश नामदेव असे आहे.