Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डाळींच्या साठेबाजांवर छापे घाला: केंद्र

Webdunia
नवी दिल्ली- बाजारात डाळींचे भाव वाढत चालले असून ते 170 रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले आहेत. या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने साठेबाजांवर छापे घालणचे आदेश तपास यंत्रणांना दिले आहेत. म्यानमार आणि आफ्रिका या देशांमधून डाळींची आयात करून महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी बफर स्टॉक आणखी मजबूत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
 
अन्नधान्याच्या वाढत्या दराचा आढावा घेण्यासाठी बुधवारी एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटली, कृषिमंत्री राधामोहनसिंह, अन्नमंत्री रामविलास पासवान, वाहतूकमंत्री नितीन गडकरी, वाणिज्यमंत्री निङ्र्कला सीतारामन, शहर विकासमंत्री एम. वेंकय्या नायडू उपस्थित होते. सध्या बाजारात डाळींचे भाव 170 रुपये प्रतिकिलो, तर टोमॅटोचे भावही 100 रुपये प्रतिकिलोच्या आसपास पोहोचले आहेत. ही दरवाढ होण्याची कारणे आणि दरवाढ रोखण्याचे पर्याय यावर प्रामुख्याने बैठकीत चर्चा झाली. डाळींची जास्त मागणी असलेल्या राज्यांसाठी बफर स्टॉकमधून डाळींचा अतिरिक्त पुरवठा करणे या बाबींवर बैठकीत चर्चा झाली.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

पुढील लेख
Show comments