पुन्हा एकदा पाकीस्थान ने त्याचा रंग दाखविला असून आधी मान्य मात्र भारताची चेष्टा सुरु केली आहे. यामध्ये नजरचुकीने पाकिस्तानात गेलेले राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाण पाकिस्तानात आलेच नाहीत अशी बोंब सुरु केली आहे. लष्कराचे डीजीएमओ रणबीर सिंग यांनी यांनी आज पाकिस्तानातील लष्कराच्या संबंधित अधिकाऱ्याशी फोनवरून बातचित केली आहे. आपला जवान चंदू बाबुलाल चव्हाण सोडण्याची रीतसर मागणी त्यांनी केली. तर उलट बॉब मारत आमच्याकडे भारतीय लष्कराचा कुठलाच सैनिक नसल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे.
या रात्रीतच चंदू चव्हाण हे नजरचुकीने पाकिस्तानात पोहोचल्याचं उघड झालं. खुद्द पाकिस्तान संरक्षण मंत्रालयानेच याबाबतची माहिती ट्विट करुन दिली होती. मात्र आता खोटारडा पाक हे मान्य करत नहिये. तर दुसरीकडे भारताच्या सुरक्षा समितीची बैठक पुन्हा दिल्लीत सुरु असून भारत पुन्हा पाकला धडा शिकवणार आहे असे चिन्हे दिसत आहे.