Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लष्करी हिसका न दाखविल्यानेच पाकव्यात काश्मिर गमावला!

Webdunia
शुक्रवार, 2 सप्टेंबर 2016 (09:14 IST)
पाकिस्तानला लष्करी हिसका न दाखविल्यानेच पाकव्यात काश्मिर गमावल्याचे मत भारतीय हवाई दलाचे प्रमुख अरुप राहा यांनी मांडल्याने खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या एका चर्चासत्रात ते म्हणाले, भारताने काश्मीर प्रश्नावर नैतिकतेची भूमिका घेतली. मात्र, लष्करी पद्धतीने तोडगा काढायला हवा होता. 1971 च्या युद्धापर्यंत तत्कालीन सरकारने भारतीय हवाई दलाच्या बलस्थानांचा योग्य पद्धतीने वापरच केला नाही. अन्यथा आज पाकव्याप्त काश्मीर आज आपल्याकडेच असते. 
 
भारताने स्वत:च्या सुरक्षेसाठी व्यावहारिक दृष्टीकोन दाखवलाच नाही, अशी खंतही व्यक्त करुन ते म्हणाले, पाकव्याप्त काश्मीर हा आजही आमच्यासाठी घशात अडकलेल्या काट्याप्रमाणे रुतला आहे. मात्र, शत्रूंवर नियंत्रण मिळवण्यात किंवा संघर्ष रोखण्यासाठी भारताने हवाई दलाचा योग्य वापर केला असता तर हा काटा कधीच निघाला असता.

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

पुढील लेख
Show comments