पीएम मोदी यांचे स्वच्छ भारत मोहिमेला देशभरात मान्य करण्यात येत आहे. जेथे त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यात येत आहे आणि त्याला आपलेसे केले जात आहे तेथेच एका व्यक्तीने स्वच्छ भारत मोहिमेच्या अंतर्गत आपल्या बायकोची हत्या करून लाश ठिकाण्यावर लावण्याचा प्लन तयार केला.
राजसमंद जिल्ह्यातील मजरेगांवमध्ये राहणारा चांदमल जैन याने असे दर्शवले की तो स्वच्छ भारत मोहिमेमुळे फारच प्रभावित झाला आहे. जेव्हा गावात जास्तकरून लोक आपल्या घरात टॉयलेट बनवत होते तेव्हा चांदमलने देखील असे करण्याचे विचार केले.
गांवाच्या लोकांना वाटले की चांदमल घरात टॉयलेट बनवून फार छान काम करत आहे आणि त्यासाठी त्याचे कौतुकही करण्यात आले. पण जेव्हा लोकांसमोर खरं आले तेव्हा गावाच्या लोकांचे होश उडून गेले. चांदमलने आपल्या घरात टॉयलेटसाठी गड्डा खोदला पण त्यावर टॉयलेट न बनवता तेथे बायकोला जिवंत पुरून दिले.
यानंतर तो कांदिवली पळून गेला जेथून पोलिसांनी त्याला अटक केले. पोलिसानुसार चांदमल राजस्थानच्या मजेरगांव येथे राहणारा असून तेथे त्याचे किराण्याचे दुकान आहे. केलवाड़ा पोलिसानुसार चांदमलची 2013मध्ये सरिताशी लग्न झाले होते. लग्नानंतर सरिता आजारी राहू लागली आणि डॉक्टरांनी तिला बेडरेस्ट सांगितले होते.
या दरम्यान तिने एका मुलाला जन्म दिला पण तो देखील जास्त दिवस जिवंत राहू शकला नाही. बायकोच्या आजारपणापासून त्रस्त होऊन चांदमलने तिची हत्या करण्याचा कट रचला. एप्रिलमध्ये चांदमलने काही स्थानीय मजुरांना बोलावून घरात टॉयलेट बनवण्यासाठी गड्डा खोदला. जेव्हा मजूर गड्डा खोदून चालले गेले तेव्हा चांदमलने आपल्या बायकोला त्यात जिवंत पुरले.
पुढच्या दिवशी त्याने मजुरांना हे म्हणत काम करण्यास मनाई केले की त्याच्या जवळचे पैसे आता संपले आहे. चांदमल समोर परिस्थिती तेव्हा अवघड झाली जेव्हा शेजारच्या लोकांनी व नातेवाइकांनी त्याला बायकोबद्दल विचारणे सुरू केले.
त्याने आधीतर हेच सांगितले की ती आपल्या आईकडे गेली आहे. नंतर त्याने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली की त्याची बायको घरातून 5 हजार रुपये घेऊन गेली पळून गेली आहे. शेवटी रविवारी घरात खोदणे तेव्हा बायकोचे शव जप्त करण्यात आले आणि चांदमलला मुंबईच्या कांदिवली स्थित त्याच्या नातेवाइकांकडून अटक करण्यात आले आहे.