Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीयांचा दिवसातील 47 टक्के वेळ व्हॉटस् अँपवर

Webdunia
मंगळवार, 30 जून 2015 (11:11 IST)
भारतातील स्मार्टफोन वापरणारे एका दिवसातील जवळपास अर्धावेळ मेसेजिंग अँप्लिकेशन्सवर घालवतात, असे एका सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. इरिक्सन या स्वीडिश कंपनीने एक सर्वेक्षण केले, त्यात ही माहिती समोर आली आहे. 
 
या सर्वेक्षण अहवालानुसार भारतीयांचा एक दिवसातील तब्बल 47 टक्के वेळ व्हॉटस् अँप, वुई चॅट, स्काईप, हाईकसारख्या मेसेजिंग अँपवर जातो. इरिक्सनच्या अहवालानुसार, स्मार्टफोन्सवर संवादाची प्रक्रिया सतत सुरूच असते. त्यामुळे कित्येकांच्या स्मार्टफोन्सवर हे अँप्स हे कायम ‘ऑन’ असतात. मोबाइल ब्रॉडबँडचा सर्वाधिक वापर या अँप्सच्या वापरासाठीच केला जातो. भारतीय लोक आपल्या एका दिवसातील वेळेच्या 47% वेळ स्मार्टफोन्सवर व्हॉइस, इन्स्टंट मेसेजिंग, स्काईप, ई-मेल्स किंवा सोशल नेटवर्किग साईट्सच्या वापर करण्यात घालवतात, असे स्पष्टपणे या अहवालात म्हटले आहे. 
 
स्वीडनमधील टेलिकॉम उपकरणे तयार करणारी कंपनी ‘इरिक्सन’कडून या संशोधनात भारत, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन व अमेरिकेतील अँड्रॉइड वापरकत्र्यांचे नमुने वापरण्यात आले होते. भारतात 7 हजार 500 अँड्रॉईड वापरकत्र्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments