rashifal-2026

पुणे विद्यापीठात धुडगूस घालणाऱ्या अभाविप विद्यार्थ्यांवर काय कारवाई करणार?

Webdunia
सोमवार, 24 एप्रिल 2023 (21:41 IST)
पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये अश्लील गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यानंतर या गोष्टीचा निषेध करत या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. परंतु, आता या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत अभाविपच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी धुडगूस घातला. तसेच या आंदोलक विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठात सुरू असलेली कुलगुरुंची बैठक देखील उधळवून लावली. यावेळी या विद्यार्थ्यांनी तोडफोड करत जोरदार घोषणाबाजी केली. पण यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
आमदार रोहित पवार यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. “#रॅपसाँग प्रकरणी चौकशी सुरू असताना मोठी शैक्षणिक परंपरा असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घुसून धुडगूस घालत केलेल्या तोडफोडी च्या कृत्याचा तीव्र निषेध! एरवी आपल्या रास्त शैक्षणिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणारं सरकार, आज धुडगूस घालणाऱ्यांवर काय कारवाई करणार? #SPPU” असे ट्वीट केले आहे. त्यामुळे या आंदोलक विद्यार्थ्यांवर काही कारवाई करण्यात येणार आहे की नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

International Animal Rights Day 2025 : आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क दिन

World Human Rights Day 2025 जागतिक मानवी हक्क दिन

Indigo Crisis इंडिगोचे संकट नवव्या दिवशीही कायम, दिल्ली-मुंबई विमानतळावर उड्डाणे रद्द

गर्दीच्या वेळी रेल्वेच्या दाराजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नाही, मुंबई उच्च न्यायालयाने भरपाई मान्य केली

मुंबईहून उत्तर प्रदेश-बिहार मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी; काँग्रेस नेत्याने रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहले

पुढील लेख