Festival Posters

आंबेठान : शेतातील खड्ड्यात पडून एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 12 जुलै 2022 (21:24 IST)
आंबेठाण येथे सख्ख्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज दुपारी महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मुलांचे वडील किशोर दास कामगार असून भाड्याच्या खोलीत राहतात. घराजवळ असलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडून या तिघा भावांचा मृत्यू झाला रोहित दास,(7 वर्षे), राकेश दास(5वर्षे),श्वेता दास(6 वर्षे ) अशी मयत मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे मुलांच्या कुटुंबियांना मोठा धक्का लागला आहे. हे शेत आंबेठाणातील नामदेव भिकाजी लांडगे यांचे असून त्याच्या जवळ भाऊसाहेब निवृत्ती लांडगे यांचे घर असून त्या घरात कामगार किशोर जोगेश्वर दास हे राहत होते. या घरा जवळच खडडा होता आणि तो पाण्याने भरलेला होता.त्यात पावसाचं पाणी साचलं होत आणि हे तिघे त्यात खेळत असताना त्यांना खड्ड्याच्या अंदाज आला नाही आणि ते तिघे पाण्यात बुडून मरण पावली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments