Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात नवले पुलाजवळ विचित्र अपघात, ट्रकने 8 वाहनांना धडक दिली

Webdunia
रविवार, 11 जुलै 2021 (12:05 IST)
मुंबई बंगळुरू महामार्गावर ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने वडगाव बुद्रूकच्या नवले पुलानजीक हायवेवर विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहे.
 
मुंबई बंगळुरू महामार्गावर साताराकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या माल ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर असलेल्या आठ वाहनांना धडक दिली. या अपघातात ४ चारचाकी, ३ रिक्षा वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी सकाळी नवले पुल येथे घडली. शनिवारी सकाळी साडे सात ते 8 वाजेच्या सुमारास नवले पुलाजवळ हा विचित्र अपघात घडला.
 
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताराकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या माल ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
 
साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने भाजीपाला घेऊन निघालेला माल ट्रक ( क्रमांक : डी डी ०१ सी ०४६७ ) सकाळी नवले पुल व वडगांव पुल येथील हॉटेल विश्वास समोर आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने समोरच असणाऱ्या ४ चारचाकी वाहनांना व ३ रिक्षाला जोरदार धडक दिली, त्यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. तर ८ गाड्यांचे नुकसान झाले आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अंकुश कर्चे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून जखमींची माहिती घेत आहेत. सकाळी झालेल्या या अपघातामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या ट्रकच्या धडकीत या आठही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments