Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वदेशी चार्जर, पुण्यातील ARAI ने विकसित केले तंत्रज्ञान

Webdunia
बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (15:32 IST)
इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी आणि वापरात वाढ झाली आहे. या वाहनांना आवश्यक चार्जिंगसाठी आता स्वदेशी चार्जर उपलब्ध होणार आहे.पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (ARAI) स्वदेशी प्रोटो टाइप चार्जर सिस्टीम तंत्रज्ञान  विकसित केले आहे.हे तंत्रज्ञान भारत चार्जर्स स्टॅण्डर्ड,कॅडेमो,सीसीएस यांच्या तोडीचे आहे. त्यामुळे याद्वारे भारतीय कंपन्यांना आता या स्वदेशी चार्जरचे उत्पादन करता येणे शक्य होणार आहे.

एआरएआयचे संचालक डॉ.रेजी मथाई यांनी याबाबत माहिती देण्यासाठी पौड रोड, कोथरूड पत्रकार परिषद घेतली होती.‘इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेले चार्जर सध्या आयात करण्यात येत आहेत मात्र केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडिया या उपक्रमांमध्ये सहभागी होत एआरएआयने लाइट ईव्ही एसी चार्ज पॉइंट तंत्रज्ञान विकसित केले आहे,’अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

‘एआरएआयने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या वतीने भारत एसी 001 या पहिल्या चार्जरची निर्मिती केली जाणार आहे यासाठी आवश्यक टेस्टिंग हे एआरएआय प्रयोगशाळेत पूर्ण झाले असून त्याचा अनुपालन अहवाल देखील कंपनीच्या उच्चपदस्थ अधिका-यांकडे सुपूर्त करण्यात आला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील हा पहिलाच चार्जर असून या आधी एका खासगी संस्थेने हे तंत्रज्ञान एआरएआयकडून घेतले आहे,’असे उपसंचालक आनंद देशपांडे यांनी सांगितले.

‘पुण्याजवळील ताकवे येथे एआरएआयच्या वतीने नव्या मोबिलिटी रिसर्च सेंटरची उभारणी करण्यात येणार असून येत्या 4 ते 5 वर्षात विविध टप्प्यांत ते कार्यान्वित होईल. या सेंटरसाठी विविध टप्प्यात एकूण 500 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.’ असे एआरएआय संचालक डॉ. रेजी मथाई यांनी यावेळी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

प्रज्ञानंदने देशबांधव हरिकृष्ण, गुकेश आणि अर्जुन इरिगेसी यांचा पराभव केला

विराट कोहली 12 वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज,खेळणार रणजी सामना

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, 35 नेत्यांनी एकत्र पक्ष सोडला, केला भाजपमध्ये प्रवेश

तुर्कीच्या रिसॉर्टला भीषण आग, 66 जण होरपळून ठार; अनेक जण गंभीर जखमी

उपमुख्यमंत्री अजित पवार जालन्यातील स्थानिक प्रशासनावर नाराज,अधिकाऱ्यांना खड़सावले

पुढील लेख
Show comments