Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वदेशी चार्जर, पुण्यातील ARAI ने विकसित केले तंत्रज्ञान

Webdunia
बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (15:32 IST)
इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी आणि वापरात वाढ झाली आहे. या वाहनांना आवश्यक चार्जिंगसाठी आता स्वदेशी चार्जर उपलब्ध होणार आहे.पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (ARAI) स्वदेशी प्रोटो टाइप चार्जर सिस्टीम तंत्रज्ञान  विकसित केले आहे.हे तंत्रज्ञान भारत चार्जर्स स्टॅण्डर्ड,कॅडेमो,सीसीएस यांच्या तोडीचे आहे. त्यामुळे याद्वारे भारतीय कंपन्यांना आता या स्वदेशी चार्जरचे उत्पादन करता येणे शक्य होणार आहे.

एआरएआयचे संचालक डॉ.रेजी मथाई यांनी याबाबत माहिती देण्यासाठी पौड रोड, कोथरूड पत्रकार परिषद घेतली होती.‘इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेले चार्जर सध्या आयात करण्यात येत आहेत मात्र केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडिया या उपक्रमांमध्ये सहभागी होत एआरएआयने लाइट ईव्ही एसी चार्ज पॉइंट तंत्रज्ञान विकसित केले आहे,’अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

‘एआरएआयने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या वतीने भारत एसी 001 या पहिल्या चार्जरची निर्मिती केली जाणार आहे यासाठी आवश्यक टेस्टिंग हे एआरएआय प्रयोगशाळेत पूर्ण झाले असून त्याचा अनुपालन अहवाल देखील कंपनीच्या उच्चपदस्थ अधिका-यांकडे सुपूर्त करण्यात आला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील हा पहिलाच चार्जर असून या आधी एका खासगी संस्थेने हे तंत्रज्ञान एआरएआयकडून घेतले आहे,’असे उपसंचालक आनंद देशपांडे यांनी सांगितले.

‘पुण्याजवळील ताकवे येथे एआरएआयच्या वतीने नव्या मोबिलिटी रिसर्च सेंटरची उभारणी करण्यात येणार असून येत्या 4 ते 5 वर्षात विविध टप्प्यांत ते कार्यान्वित होईल. या सेंटरसाठी विविध टप्प्यात एकूण 500 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.’ असे एआरएआय संचालक डॉ. रेजी मथाई यांनी यावेळी सांगितले.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments