Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Malshej : काळू धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू

Webdunia
रविवार, 20 ऑगस्ट 2023 (15:44 IST)
Malshej : सध्या सर्वत्र पावसाळा सुरु आहे. या हंगामात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक पाण्याच्या ठिकाणी जाण्याचा बेत आखतात. या हंगामात धरण्याच्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. अशा ठिकाणी पाय निसटून अपघात होऊन काही उत्साही लोक मृत्युमुखी होतात. 

असाच प्रकार माळशेज घाटातील काळू धबधब्यात घडला आहे. या धबधब्यात पडून एका तरुणाचा दुर्देवी अंत झाल्याची घटना घडली आहे. अभिषेक रावलकर असे या मयत तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह एका आठवड्यानंतर सापडला आहे. 

हा तरुण हैद्राबादचा राहणारा असून आपल्या 3 मित्रांसह मुरबाड तालुक्यातील थितबी गावातून काळू धबधब्यात वर्षाविहारचा आनंद घेण्यासाठी गेला असताना तोल जाऊन काळू नदीत जाऊन पडला आणि पाण्याच्या वाहत्या प्रवाहात वाहून गेला. या नदीला खोल डोह असल्यामुळे तो डोहात गेला. 

अपघाताची माहिती मिळतातच जुन्नर रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी अभिषेकचा शोध घेतला. मात्र अंधारामुळे रेस्क्यू टीमला शोध मोहीम थांबवावी लागली. नंतर गेले सहा दिवसांपासून त्याचा शोध घेतला जात होता मात्र रेस्क्यू टीमला अपयश मिळाला. नंतर रायगड रेस्क्यू टीमने शोधल्यावर आठवड्यांनंतर अभिषेकच्या मृतदेह सापडला. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे. सध्या हा धबधबा प्रशासनाकडून पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टी20 विश्व कप विजेता भारतीय टीमचा होईल रोड शो, वानखेडे स्टेडियममध्ये होणार सत्कार

फ्रीज उघडताच लागला विजेचा झटका, आई आणि मुलीचा मृत्यू

Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

‘लष्कराकडून 1 कोटींची मदत मिळाली नाही,’ स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीराचे कुटुंबीय म्हणतात...

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे होतील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, सीट शेयरिंग पूर्वीच नेत्याने दिला जबाब

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र: गुप्त धनाचा लोभ, नरबळी देण्यासाठी चालली होती अघोरी पूजा

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

Maharashtra: अंगणवाडी मध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या पॅकेटात निघाला मेलेला साप

मराठा आरक्षणला घेऊन आली मोठी बातमी

हाथरस चेंगराचेंगरी : या दुर्घटनेमुळे वादात अडकलेल्या बाबांनी प्रसिद्ध केलं पत्र, काय म्हटलं?

पुढील लेख
Show comments